कर्नाटकच्या
पहिल्या युध्दामुळे डुप्लेची राजकीय महत्वाकांक्षा अधिक वाढली. भारतीय
राजांमध्ये सुरु असलेल्या संघर्षात भाग घेउन फ्रेंचांचा राजकीय प्रभाव
वाढविण्याचा त्याने निणर्य घेतला. या स्थितीचे वर्णन करताना मॅलेसन
म्हणतो. महत्वाकंाक्षा जागृत होऊ लागल्या, परस्पर द्वेष वाढू लागले.
युरोपियनांना शांततेशी काहीच देणे घेणे नव्हते कारण आकांक्षा पूर्तीसाठी
संधी दार ठोठावत होती. ही संधी हैद्राबाद व कर्नाटकच्या निर्वादास्पद
वारसांमूळे प्राप्त झाली.
हैद्राबादचा
निजाम उल मुल्क आसफजाह याचा मे १७४८ मध्ये मृत्यू झाला त्यांच्यानंतर
त्याचा मुलगा नासिरजंग हैद्राबादच्या गादीवर बसला. परंतु त्याला निजाम उल
मुल्काचा नातू मुझॅफ्फरजंगने आव्हान दिले. याच वेळी कर्नाटकचा नबाब
अन्वरुद्दीन आणि त्याचा मेहुण चंदासाहेब यांच्यात संघर्ष निर्माण झाला. या
संघर्षपूर्ण राजकीय स्थितीचा लाभ घेत. मुझफ्फरजंगने दक्षिणेचा सुभेदार
आणि चंदासाहेंबास कर्नाटकचा सुभेदार बनविण्यासाठी त्यांना समर्थन देण्याचे
डुप्लेंने ठरवले स्वाभाविकच इंग्रजांनी त्यांचे प्रतिस्पर्धी अनुक्रमे
नासिरजंग व अन्वरुद्दीन यांचा पक्ष उचलून धरला. एकुण डुप्लेला खूप यश
मिळाले. मुझफ्फरजंग चंदासाहेब व फ्रेंच सैन्याचे ऑगस्ट १७४९ मध्ये अंबूर
येथे अन्वरुद्दीनचा पराभव करुन त्यास ठार मारले. तसेच डिसेंबर १७५० मध्ये
झालेलया एका संघर्षात नासिरजंगसुध्दा मारला गेला. मुझफ्फरजंग दक्षिणेचा
सुभेदार बनला व आपल्या समर्थकांना त्याने फार मोठी बक्षिसे दिली. कृष्णा
नदीच्या दक्षिणेकडील मोगल प्रदेशाचा गव्हर्नर म्हणून डुप्लेंची नियुक्ती
करण्यात आली. या वेळी फ्रेंचांना बराच प्रदेश हैद्राबादला ठेवण्यात आली.
चंदासाहेब कर्नाटकचा नबाब बनला. १७५१ डुप्ले या वेळी आपल्या यशाच्या व
राजकीय शक्तीच्या शिखरावर होता.
परंतु
लवकरच फ्रेंचांसमोर नविन आव्हान उभे राहिले. अन्वरूद्दीनचा मुलगा मुहम्मद
अलीने त्रिचनापल्लीला आश्रय घेतला होता. त्यामुळे चंदासाहेब व फ्रेंच
सैन्याने त्रिचनापल्लीच्या किल्ल्यास वेढा घातला त्याला शह देण्यासाठी
इंग्रजांचा प्रतिनिधी रॉर्बट क्लाईव्ह याने फक्त २१० सैनिकांसह कर्नाटकची
राजधानी असलेले अकराट जिंकून घेतले. राजधानी अकराट जिंकून घेण्यासाठी
चंदासाहेबाने ४००० सैनिक पाठविले, परतु क्लाईव्हने अकराटचे योग्य पध्दतीने
संरक्षण केले. त्यामुळे फ्रेंचांना अकराट जिंकता आले नाही. हा
फ्रेंचांच्या प्रतिष्ठेला जोरदार धक्का बसला.
जून
१७५२ मध्ये त्रिचनापल्लीला वेढा घातलेल्या फ्रेंच इंग्रजांसमोर शरणागती
पत्करली. याच सुमारास चंदासाहेब तंजावरच्या राजाकडून मारला गेला.
त्रिपनापल्लीला झालेल्या फ्रेंचांच्या पराभवामुळे डुप्लेचे महत्व कमी
झाले. या युध्दात झालेल्या वित्त हानीमुळे फ्रेंच कंपनीच्या संचालकांनी
डुप्लेला परत बोलावून घेतले. १७५४ मध्ये गॉडेव्हयूला डुूप्लेंचा
उत्तराधिकारी नियुक्त करून भारतातील फ्रेंच प्रदेशाचा गव्हर्नर म्हणून
नेमणूक करण्यात आली फ्रेंचांनी इंग्रजांशी पाँडेचरीचा तह करुन हे युध्द
समाप्त केले.
एकंदरीत
हे युध्द अनिर्णित अवस्थेत संपले. जमिनीवर लढल्या गेलेल्या युध्दांत
इंग्रजांचे वर्चस्व राहिले. इंग्रजांनी मुहम्मदअली यास कर्नाटकाच्या नबाब
पदी बसवले असे असले तरी हैद्राबाद राज्यात अजूनही फ्रेंचंाची परिस्थिती
चांगली होती. मुझफ्फरजंग एका लहानशा संघर्षात मारला गेल्यावर
हैद्राबादच्या गादीवर बसलेल्या सलाबतजंगाकडून फ्रेंचांनी बराच प्रदेश
जहागीरी म्हणून पदरात पाडून घेतला. ३० लक्ष रु वार्षिक उत्पन्नाचा भू भाग
फ्रेंच कंपनीला देण्यात आला. थोडक्यात दुसर्या कर्नाटक फ्रेंचांची
पिछेहाट झाली तर इंग्रजांची परिस्थिती अधिक दृढ झाली.
No comments:
Post a Comment