इ.स.
१७८९ मध्ये फ्रेंच राज्यक्रांती यशस्वी होऊन तेथे लोकशाही शासन
व्यवस्थेची निर्मिती झाली होती. पुढे याच राज्यक्रांतीतून नेपोलियन
बोनापर्ाटचा उदय झाला. त्याने आपल्या कारकिर्दीतचत सर्व युरोपला सळो कि पळो
करून सोडले होते. इ.स. १७९८ मध्ये नेपोलियनने इजिप्तवर स्वारी करुन तो
देश जिंकलीा तेथून भारतात येऊन इंग्रजांना हाकलून लावण्याचा त्याचा बेत
होता. इ.स. १७९८ मध्येच र्लॉड वेलस्ली याने भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून
सत्ता आपल्या ताब्यात घेतली होती. युरोपात इंग्रज व फ्रेंच यांच्यातील
संघर्षाची त्यास कल्पना होती.
भारतात
ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार करण्यास वेलस्ली जेवढा उत्सूक होता तेवढाच
तो नाममात्र शिल्लक राहिलेल्या फ्रेंच सत्तेच्या खाणाखुणा संपुष्टात
आणण्यास उतावीळ झाला होता. अनेक देशी संस्थानिकांकडे फ्रेंच लोक सैन्यात
काम करीत होते. टिपू सुलतान दौलतराव श्ंिादे व हैद्राबादचा निजाम यांनी
कवायती सैन्य ,तोफा, बंदुका व दारुगोळयाची सुसज्ज केल्या होत्या
फ्रान्समध्ये नेपोलियनचा उदय झाल्यामूळे आता फ्रेंचांना भारतातून हुसकावून
लावून नेपोलियनच्या आफि्रका व आशियातील वाढत्या आक्रमणास पायबंद घालणे.
हा उद्देश र्लॉड वेलस्लीने जाहीर केला. निजामाकडे चौदा हजार व शिद्यंाकडे
चाळीस हजार फ्रेंच सेना असल्याचा प्रचार करुन त्याने तिचे पारिपत्य
करण्यासाठी संचालकांकडून संमती मिळविली. टिपू सुलतान फ्रेंचांच्या नादी
लागला म्हणून त्याने चौथ्या इंग्रज म्हैसूर युध्दात त्याचा अंत केला.
र्लॉड वेलस्लीने लासवाडी आणि असराईच्या युध्दात दौलतराव श्ंिाद्यांचाही
पराभव केला. एवढयावर संतोष न मानता वेलस्लीने फ्रेंचांच्या बंदोवस्तासाठी
भारताबाहेरही अनेक कारवाया केल्या जॉन माल्कमला त्याने इ.स. १८०३ मध्ये
तेहरान येथे पाठविले. डच लोक फ्रेंचांचे मित्र असल्यामूळे वेलस्लीने
त्यांचा जावा व इतर बेटे जिंकून घेण्याचा आणि मॅारिशसवर आपले वर्चस्व
प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला इजिप्तमध्ये याच वेळी त्याने सेनापती
बेर्यडला एक फौज देऊन पाठविले. परंतु वेलस्लीचे हे सर्व प्रयत्न अयशस्वी
झाले. वेलस्लीने केलेल्या या उठाठेवींचा एक फायदा झाला. तो म्हणजे
फ्रेंचांचा पार निकाल लागला आणि भारतीय राजकारणातून त्यांचे पूर्णपणे
उच्चाटन झाले.
No comments:
Post a Comment