१७५६
मध्ये युरोपात इंग्लंड व फ्रान्समध्ये पुन्हा युध्द सुरु झाले. ते
सप्तवर्षीय म्हणून प्रसिध्द आहे. त्याचे पडसाद भारतात उमटून इंग्रज फ्रेंच
संघर्ष पुन्हा सुरु झाला. फ्रेंच सरकारने ताबडतोब काऊंट लाली यास भारतात
पाठविले तो जवळजवळ एक वर्ष प्रवास करीत एप्रिल १७५८ मध्ये भारतात येऊन
पोहोचला या दरम्यान सिरोजउद्दीला या पराभव करुन इंग्रजानी बंगालवर आपले
नियंत्रण प्रस्थापित केले होते. त्यास इंग्रजांचा जो प्रचंड आर्थिक
फायदा झाला, त्याचा उपभोग त्यांनी फ्रेंचांविरुध्द लढण्यास केला.
काऊंट
लालीने १७५८ मध्येच पाॅंडेचरी जवळ असलेला सेंट डेविड किल्ला जिंकून घेतला
त्यानंतर त्याने तंजावरवर आक्रमण करण्याचा आदेश दिला. कारण तंजावरच्या
राजाकडून ५६ लक्ष रुपये घ्यावयाचे होते. परंतु या मोहिमेत अपयश आल्यामुळे
फ्रेंचांच्या आरमार आल्यामुळे त्याने हा वेढा उठवला. त्यानंतर लालीने
बूसीला हैद्राबाद येथून बोलावून घेतले पण ही त्याची चूक ठरली. कारण
त्यामुळे हैद्राबादला फ्रेंचांची स्थिती कमकुवत झाली. दुसर्या बाजूला
पोकॅाकच्या नेतृत्वाखाली इंग्रज आरमारी तुकडीने डी अॅशच्या नेतृत्वाखाली
असलेल्या फ्रेंच आरमारी तुकडीचा तीन वेळा पराभव करुन त्यांना भारतीय
सागरातून परत सेनानी सरआयकूट याने वांदिवाश येथे फ्रेंचांचा जबरदस्त पराभव
केला. खुद्द बुसीला युध्दकैदी बनविण्यात आले. युध्दातील या पराभावामुळे
फ्रेंच पॉडेंचरीला परत गेले. पण इंग्रजांनी पाँडेचरीलाच वेढा घातला शेवटी
आठ महिन्यानंतर फ्रेंचांनी पॉडेचरी इंग्रजांच्या ताब्यात दिले.
कर्नाटकाच्या तिसर्या युध्दात फ्रेंचांचा अंतिम पराभव झाल्यामुळे हे
युध्द निर्णायक सिध्द झाले. १७६३ च्या पॅरिसच्यातहाने सप्तवर्षीय युध्द
थांबल्यावर भारतातील संघर्षही संपुष्टात आला. या तहानुसार पॉडेचरी व काही
प्रदेश फ्रेंचांना परत मिळाला असला तरी यापुढे फ्रेंचांनी इंग्रजाविरूध्द
युध्द करण्याची हिंमत केली नाही. येथून फ्रेंच सज्ञ्ल्त्;ाा भारतात वाढू
शकती नाही.
No comments:
Post a Comment